क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले



           ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेऊन स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईंना , ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वत:चे व्यक्तिमहत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली.                                   महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री - शिक्षण व दलितधारक कार्य करणाऱ्या त्यांच्या  सौभाग्यवती  सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री ही कन्या जन्मली.  त्याची ही एकुलती एक लाडकी मुलगी होती .त्या काळात बालविवाहाची प्रता होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरू झाली.शिवाय सावित्री हाडा पेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईंच्या आई वडिलांनी मोहीम जोरात सुरू केली. नेवसे पाटील आणि धनकवाडीचे पाटील यांचा घरोबा होता. ज्योतिबा बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षां च्या होत्या.
         सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते.त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी सांभाळले. पुढे सावित्रीबाईनी जोतिबांशी विचारविनिमय करून यशवंत च्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले ही त्यांच्या मोठेपणाची साक्ष सावित्रीबाईंना बालपणी घरच्यांकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्य नव्हते. सावित्रीबाईंना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते. ज्योतिबा बरोबर सावित्रीबाईंचा  विवाह झाल्यावर त्यांना  त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली ज्योतिबाच्या मानाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासून स्त्रीशिक्षणाला आरंभ केला होता . ज्योतिबांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य जोतिबांनी मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यामुळे त्यांचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासून म्हणजे सावित्रीबाईन  पासून केला . शेतात काम करतानाच झाडाखाली बसून काळया मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या .यामध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण चालू ठेवले. १४ जानेवारी १८४८ साली जोतिबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलींना शिकवण्याचे धाडस करायला कोणी शिक्षक पुढे येईना , तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या . स्त्रियांनी शिकणे  हे महापाप ,आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप . असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्यामुळे सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले  की अतिकर्मठ  लोकं त्यांच्यावर दगड , शेण, चिखल वैगरे फेकीत असत. पण सावित्रीबाईंना या सर्व छळाला  तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालूच ठेवले .
             सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या .त्या व्यवस्थित चालल्या म्हणून  पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ मध्ये इंग्रज सरकारने त्या पतीपत्नीचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला .  भारतातल्या मुलींना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे  व्रत चालूच ठेवले. पण हे सर्व त्या पतीच्या पावलांवर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर या कार्यावर त्यांची निष्ठा होती, म्हणून पतिनिधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ' समता आंदोलन ' पुढे चालू ठेवले. सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्यांच्या ठायी असणाऱ्या कविमनाला जे काही आढळले  ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रूपात शब्दबदही केले . १८५४ साली त्याचा 'काव्य फुले ' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध 'मातोश्री सावित्रीबाईंची  भाषणे व गाणी ' या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिध्द करण्यात आले. कित्येक  कवितात निसर्गाची मनोरम वर्णेही आलेली आहेत . काव्यलेखनप्रमाणे त्यांनी ' गृहिणी ' या मासिकात लेखही लिहिले. त्यांच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परीणामकारक झाले आहेत .
            सावित्रीबाईंनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते . अनाथांना आश्रम मिळाला ही त्यांची कार्यक्षेत्र  त्यांच्या श्रध्देने प्रभावी झाली . सामाजिक कार्यात पुढाकार  घेणे हे ध्येय होते . त्यामुळे १८७६-७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८७७ मध्ये प्लेंगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वत:च्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेंगची लागण झाले ल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच  प्लेंगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या , आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला . 
         समाजातल्या  दिन: दलितांना मायेने जवळ करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे शोभल्या . त्यांच्या थोर सामाजिक कार्या  विषयाची  कृतघ्ननता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा "  बालिका दिन " म्हणून साजरा केला जातो .

Popular posts from this blog

मी रायगड बोलतोय

लोहगड